सांगली : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या संभाव्य युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील काही नागरिक त्या देशांमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनानंतर मिळालेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यातील 44 नागरिक आखाती देशांमध्ये वास्तव्यास असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. नागरिकांचे नातेवाईक किंवा परिचित आखाती तसेच पश्चिम आशियाई देशांमध्ये राहत असतील आणि त्यांच्या सुरक्षिततेबाबत माहिती हवी असल्यास जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्थानिक नागरिकांकडून माहिती मिळाल्यानंतर संबंधित तपशील महाराष्ट्र शासनाच्या मुंबई येथील आपत्कालीन संचालन केंद्राशी (EOC) शेअर करण्यात आला आहे. पुढील माहिती मिळवण्यासाठी प्रशासनाकडून समन्वय सुरू असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने मंत्रालय, मुंबई येथील आपत्कालीन संचालन केंद्राशी समन्वय साधला असून संबंधित माहिती भारतीय दूतावासापर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
नियंत्रण कक्ष संपर्क :
- जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली – 0233-2600500
- सांगली पोलिस नियंत्रण कक्ष – 0233-2672100
- मंत्रालय नियंत्रण कक्ष, मुंबई – 9321587143
आखाती देशांमध्ये नातेवाईक असलेल्या सांगली जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यक असल्यास या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नागरिक प्रश्न बातम्या येथे वाचा : Sangli Public Issue News Today.
हेही वाचा: सांगलीत 9 मार्चपासून दुचाकी वाहनांसाठी नवी मालिका सुरू.
- जत तालुक्यात महसूल समाधान शिबिर; 7/12 दुरुस्तीपासून पीएम किसान योजना नोंदणीपर्यंत 15 सेवा एकाच ठिकाणी
- दोन वर्षांपूर्वीच्या वादातून मिरजेत कोयत्याने दुकानाची तोडफोड; सराईत गुन्हेगारास अटक
- म्हैसाळ यात्रेत पार्क केलेली मोटारसायकल चोरी; वैरण बाजार परिसरातील प्रकार
- सांगली जिल्ह्यातील 44 नागरिक आखाती देशांत अडकले ; प्रशासन सतर्क
- सांगलीत 9 मार्चपासून दुचाकी वाहनांसाठी नवी मालिका सुरू
- बैलगाडी शर्यतीला गेलेल्या युवकाची मोटारसायकल चोरी; रेठरेधरण येथील घटना









