सांगलीत कृष्णा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर; ‘हजारो मासे मृत, 5 लाख नागरिकांच्या आरोग्यास धोका’

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
सांगलीत कृष्णा नदी प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत. (प्रातिनिधिक छायाचित्र)

सांगली : सांगलीतील कृष्णा नदीत कारखान्यांकडून मळी आणि रासायनिक पाणी सोडले जात असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते पृथ्वीराज पवार यांनी केला आहे. या रासायनिक विषारी पाण्यामुळे कृष्णा नदीतील हजारो मासे मृत झाल्याचा दावा करण्यात आला असून शहरातील सुमारे पाच लाख नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

प्रसिद्धीपत्रकाद्वारे बोलताना पवार म्हणाले की, काही कारखानदारांकडून सातत्याने मळी व केमिकलयुक्त पाणी नदीत सोडले जात आहे. गेल्या एका वर्षात किमान सात वेळा अशा प्रकारे नदी प्रदूषित करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

मार्च 2024 मध्ये नदी प्रदूषणाच्या विरोधात सांगलीकर आणि पर्यावरणप्रेमींनी मानवी साखळी आंदोलनही केले होते. त्यानंतर राज्य शासनाने या प्रश्नाची दखल घेतली होती.

दरम्यान, नदी प्रदूषण रोखण्यासाठी सुमारे 94 कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्ष काम पूर्ण होण्यासाठी 6 ते 12 महिने लागू शकतात. तोपर्यंत नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर राहणार असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

कृष्णा नदीत रासायनिक पाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई का केली जात नाही, असा सवाल त्यांनी महापालिका प्रशासनाला केला आहे.

तसेच नदी प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना न केल्यास गुढी पाडव्याच्या दिवशी महापालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

येथे वाचा: सांगली नागरिक प्रश्न बातम्या.

हेही वाचा: कवठेमहांकाळमध्ये 2.88 किलो गांजा जप्त; तस्कर अटकेत.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा