सांगली : सांगलीतील कृष्णा नदीत कारखान्यांकडून मळी आणि रासायनिक पाणी सोडले जात असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते पृथ्वीराज पवार यांनी केला आहे. या रासायनिक विषारी पाण्यामुळे कृष्णा नदीतील हजारो मासे मृत झाल्याचा दावा करण्यात आला असून शहरातील सुमारे पाच लाख नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
प्रसिद्धीपत्रकाद्वारे बोलताना पवार म्हणाले की, काही कारखानदारांकडून सातत्याने मळी व केमिकलयुक्त पाणी नदीत सोडले जात आहे. गेल्या एका वर्षात किमान सात वेळा अशा प्रकारे नदी प्रदूषित करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
मार्च 2024 मध्ये नदी प्रदूषणाच्या विरोधात सांगलीकर आणि पर्यावरणप्रेमींनी मानवी साखळी आंदोलनही केले होते. त्यानंतर राज्य शासनाने या प्रश्नाची दखल घेतली होती.
दरम्यान, नदी प्रदूषण रोखण्यासाठी सुमारे 94 कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्ष काम पूर्ण होण्यासाठी 6 ते 12 महिने लागू शकतात. तोपर्यंत नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर राहणार असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.
कृष्णा नदीत रासायनिक पाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई का केली जात नाही, असा सवाल त्यांनी महापालिका प्रशासनाला केला आहे.
तसेच नदी प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना न केल्यास गुढी पाडव्याच्या दिवशी महापालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
येथे वाचा: सांगली नागरिक प्रश्न बातम्या.
हेही वाचा: कवठेमहांकाळमध्ये 2.88 किलो गांजा जप्त; तस्कर अटकेत.
- बंगळुरू-मुंबई स्लीपर वंदे भारतवरून नवा वाद; सांगली-बेळगावला डावलले जाणार?
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक










