Sangli Politics : मुख्यमंत्र्यांबाबत अयोग्य भाषा वापरणाऱ्यांना जनताच योग्य उत्तर देईल, गोपीचंद पडळकर यांचा इशारा

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
मुख्यमंत्र्यांबाबत अयोग्य भाषा वापरणाऱ्यांना जनताच योग्य उत्तर देईल, असे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले. | फोटो सौजन्य : आमदार गोपीचंद पडळकर

सांगली : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात खानापूर विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापले असून, भाजपचे जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेनेचे खानापूरचे आमदार सुहास बाबर यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

एका माध्यमाशी बोलताना आमदार पडळकर यांनी सुहास बाबर यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याबाबत केलेले वक्तव्य अयोग्य असल्याचे सांगत त्याचा जाहीर निषेध केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळेच अनेक आमदार राजकारणात आले असल्याचा दावा करत, मुख्यमंत्र्यांबाबत केलेली टिप्पणी ही सत्तेच्या अहंकारातून आलेली असल्याचे पडळकर यांनी म्हटले.

वरिष्ठ नेत्यांनी मैत्रीपूर्ण लढतीच्या सूचना दिल्या असतानाही अशा प्रकारची वक्तव्ये करणे चुकीचे असल्याचे पडळकर म्हणाले. जिल्हा परिषद निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात मुख्यमंत्र्यांबद्दल अशी भाषा वापरणाऱ्यांना जनताच योग्य ते उत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला.

खानापूर मतदारसंघात भाजप कार्यकर्ते ताकदीने काम करत असून, कोणत्याही एका व्यक्तीमुळे कुठला पक्ष चालत नाही, असे सांगत पडळकर यांनी भाजपच्या संघटनात्मक ताकदीचा उल्लेख केला. पक्षाच्या कार्यकर्त्यांचा संघर्ष आणि नेतृत्वावरील विश्वास यामुळेच भाजप पक्ष मजबूत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या वक्तव्यांमुळे खानापूर विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना यांच्यातील राजकीय तणाव अधिक वाढत असून, निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून वर्तवली जात आहे.

हेही वाचा: सांगली जिल्हा बँक नोकरभरती प्रकरण; उच्च न्यायालयातील सुनावणी १३ फेब्रुवारीला.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा