सांगली : सांगलीतील कृष्णा नदीत कारखान्यांकडून मळी आणि रासायनिक पाणी सोडले जात असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते पृथ्वीराज पवार यांनी केला आहे. या रासायनिक विषारी पाण्यामुळे कृष्णा नदीतील हजारो मासे मृत झाल्याचा दावा करण्यात आला असून शहरातील सुमारे पाच लाख नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
प्रसिद्धीपत्रकाद्वारे बोलताना पवार म्हणाले की, काही कारखानदारांकडून सातत्याने मळी व केमिकलयुक्त पाणी नदीत सोडले जात आहे. गेल्या एका वर्षात किमान सात वेळा अशा प्रकारे नदी प्रदूषित करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
मार्च 2024 मध्ये नदी प्रदूषणाच्या विरोधात सांगलीकर आणि पर्यावरणप्रेमींनी मानवी साखळी आंदोलनही केले होते. त्यानंतर राज्य शासनाने या प्रश्नाची दखल घेतली होती.
दरम्यान, नदी प्रदूषण रोखण्यासाठी सुमारे 94 कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्ष काम पूर्ण होण्यासाठी 6 ते 12 महिने लागू शकतात. तोपर्यंत नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर राहणार असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.
कृष्णा नदीत रासायनिक पाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई का केली जात नाही, असा सवाल त्यांनी महापालिका प्रशासनाला केला आहे.
तसेच नदी प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना न केल्यास गुढी पाडव्याच्या दिवशी महापालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
येथे वाचा: सांगली नागरिक प्रश्न बातम्या.
हेही वाचा: कवठेमहांकाळमध्ये 2.88 किलो गांजा जप्त; तस्कर अटकेत.
- विटा-कराड मार्गावर भीषण अपघात; जखमी महिलेचा 10 दिवसांनी मृत्यू
- सांगली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीची निवड 13 मार्चला; इच्छुकांकडून मोर्चेबांधणी
- सांगलीत कृष्णा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर; ‘हजारो मासे मृत, 5 लाख नागरिकांच्या आरोग्यास धोका’
- कवठेमहांकाळमध्ये 2.88 किलो गांजा जप्त; तस्कर अटकेत
- सांगलीत ‘आमदार केसरी 2026’ भव्य बैलगाडी शर्यत; विजेत्यास 1 लाखांचे बक्षीस
- सांगलीत टाटा टेक्नॉलॉजीजचे अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र; विद्यार्थ्यांना उद्योगाधारित कौशल्यांचे प्रशिक्षण









