सांगली : सांगली शहरातील अहिल्यानगर परिसरात पूर्व वैमनस्यातून एका तरुणाची कोयत्याने हत्या झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. विनायक ऊर्फ राहुल कदम (रा. सांगली) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत राहुल कदम आणि संशयित आरोपी यांच्यात सुमारे आठ दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून शुक्रवारी दुपारी संशयितांनी राहुलवर हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
शुक्रवारी दुपारी राहुल कदम अहिल्यानगर परिसरातील महावितरण कार्यालयासमोर थांबलेला असताना चार संशयित तेथे आले. जुन्या वादाचा जाब विचारत त्यांनी अचानक कोयत्याने हल्ला चढवला. डोक्यावर व चेहऱ्यावर वर्मी घाव बसल्याने राहुल गंभीर जखमी झाला.
हल्ल्यानंतर स्थानिकांनी त्याला तातडीने सांगलीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच सायंकाळी त्याचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी घोषित केले.
घटनेनंतर चारही संशयित आरोपी स्वतःहून संजयनगर पोलीस ठाण्यात हजर झाले. पूर्व वैमनस्यातूनच हा खून झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला असून, पुढील तपास सुरू आहे. कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक आनंद घाटगे यांनी दिली.
हेही वाचा: मेंदूमृत रुग्णाच्या अवयवदानातून तिघांना जीवनदान; हरिपूरचे दीपक धर्माधिकारी मृत्यूनंतरही अवयवरूपी जिवंत.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









