Sangli Ration Update : जानेवारीपासून रेशन धान्य वाटपात बदल; सांगलीतील लाभार्थ्यांना आता किती धान्य मिळणार?

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
जानेवारीपासून रेशन धान्य वाटपात बदल लागू - (प्रातिनिधिक छायाचित्र)

सांगली : नववर्षाच्या सुरुवातीपासून सांगली जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांसाठी धान्य वाटप पद्धतीत पुन्हा एकदा बदल होणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनांमधील पूर्वीचे धान्यप्रमाण जानेवारी २०२६ पासून पुन्हा लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.

नोव्हेंबर व डिसेंबर २०२५ या दोन महिन्यांमध्ये सांगली जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना गहूसोबत ज्वारीचेही वितरण करण्यात आले होते. मात्र, हा बदल तात्पुरता असून जानेवारी महिन्यापासून ज्वारीचे वाटप थांबवून पूर्वीप्रमाणे गहू व तांदूळच दिले जाणार आहेत.

अंत्योदय योजनेंतर्गत काय बदल?

अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना मागील दोन महिन्यांत प्रत्येकी पाच किलो गहू, पाच किलो ज्वारी आणि २५ किलो तांदूळ देण्यात आला होता. मात्र, जानेवारी २०२६ पासून या योजनेत एकूण ३५ किलो धान्य देण्यात येणार असून त्यामध्ये

२१ किलो गहू आणि १४ किलो तांदूळ याचा समावेश असणार आहे.

प्राधान्य कुटुंब योजनेसाठी नवीन प्रमाण

प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना नोव्हेंबर–डिसेंबरमध्ये गहूसोबत ज्वारी देण्यात आली होती. जानेवारीपासून मात्र या योजनेत दरमहा ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ दिला जाणार आहे. यामध्ये ज्वारीचा समावेश असणार नाही.

सांगली जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना

सांगली जिल्ह्यातील सर्व रेशनकार्डधारकांनी जानेवारी महिन्याचे धान्य घेताना आपल्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन नवीन धान्यप्रमाणाची माहिती घ्यावी. वितरण प्रक्रियेत कोणताही बदल अथवा अडचण असल्यास तालुका पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अन्नधान्य वितरणातील हा बदल शासनाच्या अधिसूचनेनुसार लागू करण्यात येत असून, पुढील निर्णय येईपर्यंत हेच धान्यप्रमाण लागू राहणार असल्याचे अधिकृत माहितीत नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा: पेठ येथील सेप्टिक टँक दुर्घटनेतील पाच जखमींची प्रकृती स्थिर; तिघांवर अंत्यसंस्कार.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा