मुख्यमंत्र्यांबाबतच्या वक्तव्यावर आमदार सुहास बाबर यांना गिरीश महाजन यांचा सल्ला

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
राजकीय वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर आमदार सुहास बाबर आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन. | फोटो : संग्रहित छायाचित्र

सांगली : जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खानापूर विधानसभा मतदारसंघातील एका सभेत केलेल्या वक्तव्यामुळे शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्यावर भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली असून, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनीही बाबर यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत बाबर यांना सल्ला दिला आहे.

मुंबईत माध्यमांशी बोलताना महाजन यांनी, मुख्यमंत्र्यांचा एकेरी पद्धतीने उल्लेख करणे अयोग्य असल्याचे सांगितले. अशा प्रकारची भाषा राजकीय संस्कृतीला धरून नसल्याचे महाजन म्हणाले. सुहास बाबर यांची ही पहिलीच टर्म असून ती शेवटची ठरू शकते, त्यामुळे त्यांनी वक्तव्यांमध्ये संयम ठेवणे गरजेचे असल्याचा सल्लाही त्यांनी दिला.

बाबर यांनी केलेल विधान चुकीच असल्याच सांगत, “राजकारणात बोलताना तोल सांभाळणे आवश्यक असते. अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात,” असा इशाराही महाजन यांनी दिला. या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच, उपमुख्यमंत्री आणि शिंदेसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांना समज द्यावी, अशी अपेक्षाही महाजन यांनी व्यक्त केली. या वक्तव्यामुळे खानापूर विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिंदेसेना यांच्यातील राजकीय तणाव अधिकच वाढत चालल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांबाबत अयोग्य भाषा वापरणाऱ्यांना जनताच योग्य उत्तर देईल, गोपीचंद पडळकर यांचा इशारा.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा