सांगली : मराठी भाषा पंधरवड्याच्या निमित्ताने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या निवासस्थानी ‘कृष्णाकाठचा साहित्य मेळावा : साहित्यिकांची मांदियाळी’ हा अनौपचारिक पण अर्थपूर्ण साहित्यिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. साहित्यिक, कवी आणि अभ्यासकांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्याने सांगलीच्या साहित्यिक परंपरेला नवे बळ दिले.
या मेळाव्याचे केंद्रबिंदू ठरल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा प्रा. डॉ. तारा भवाळकर. मराठी साहित्यविश्वातील त्यांच्या दीर्घकालीन योगदानाबद्दल जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगलीकरांच्या वतीने त्यांचा सन्मान केला. यावेळी प्रा. डॉ. तारा भवाळकर यांनी प्रशासनाच्या वातावरणात साहित्यिक उपक्रम घडत असल्याबद्दल आनंद व्यक्त करत, आपल्या साहित्यसाधनेतील अनुभव कथन केले तसेच काही कविता सादर केल्या.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले की, प्रा. डॉ. तारा भवाळकर यांच्या लेखनातून स्त्री-अनुभव, सामाजिक वास्तव आणि मानवी नातेसंबंध यांचे सूक्ष्म दर्शन घडते. मराठी भाषा पंधरवड्याच्या निमित्ताने त्यांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.
कार्यक्रमात मनोरमा साहित्य संमेलन, सोलापूर–२०२५ या साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले. तसेच रंगलेल्या काव्यमैफलीत ज्येष्ठ व नव्या पिढीतील अनेक कवींनी कविता सादर केल्या. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी अशोक काकडे, त्यांच्या पत्नी शरदिनी काकडे आणि त्यांचे चिरंजीव यांनीही कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
या साहित्य मेळाव्यास उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, साहित्यिक, कवी, अभ्यासक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच या कार्यक्रमाने सांगली जिल्ह्याच्या साहित्यिक परंपरेला नवी चालना मिळाली.
हेही वाचा: विवाहितेचे अपहरण; घरात घुसून पती व नातेवाईकांना मारहाण.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










