मातामृत्यू झाल्यास मुलांसाठी सांगली जिल्हा परिषदेची अनुदान योजना; कोण पात्र, कसा मिळतो लाभ?

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
सांगली जिल्हा परिषद (ZP Sangli) | फोटो : अधिकृत संकेतस्थळ

सांगली : प्रसूतीदरम्यान किंवा प्रसूतीनंतर आईचा मृत्यू झाल्यास मागे राहिलेल्या मुलांच्या संगोपनासाठी आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने मातामृत्यू लाभ योजना राबवली जात आहे. सांगली जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागामार्फत ही योजना ग्रामीण भागासाठी लागू असून, पात्र कुटुंबांना ₹15,000 पर्यंतचे अनुदान राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राच्या स्वरूपात दिले जाते.

ग्रामीण भागात प्रसूतीशी संबंधित गुंतागुंतीमुळे होणाऱ्या मातामृत्यूंच्या घटनांनंतर अनेक कुटुंबांवर आर्थिक व सामाजिक संकट कोसळते. अशा वेळी मुलांच्या भविष्यासाठी किमान आर्थिक आधार मिळावा, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

किती रक्कम मिळते?

जर प्रसूतीशी निगडीत कारणाने मातेचा मृत्यू पहिल्या जिवंत अपत्यापर्यंत झाला असेल, तर ₹15,000 इतकी रक्कम दिली जाते.

दोन जिवंत अपत्यांनंतर मातेचा मृत्यू झाल्यास, दोन्ही मुलांच्या नावे प्रत्येकी ₹7,500 प्रमाणे एकूण ₹15,000 चे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र दिले जाते. नवजात बाळाचे नाव ठेवलेले नसल्यास, प्रमाणपत्रावर पालक म्हणून वडिलांचे नाव नमूद केले जाते.

कोण पात्र ठरते?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी मृत माता सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवाशी असणे आवश्यक आहे. मातेचा मृत्यू हा प्रसूतीपूर्व, प्रसूतीदरम्यान किंवा प्रसूतीनंतर 42 दिवसांच्या आत गरोदरपणाशी संबंधित कारणाने झालेला असावा. तसेच सदर मातेची प्रसूती किंवा गर्भपात शासनमान्य रुग्णालयात झालेला असणे आवश्यक आहे.

मृत मातेची RCH पोर्टलवरील आणि R-15 नोंदणी असणे बंधनकारक आहे. एक किंवा दोनच जिवंत अपत्ये असलेल्या प्रकरणांमध्येच हा लाभ दिला जातो; अपत्य नसल्यास किंवा दोनपेक्षा जास्त अपत्य असल्यास लाभ मिळत नाही.

अर्ज कसा करायचा?

या योजनेसाठीचा प्रस्ताव संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत तयार करून जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सांगली यांच्याकडे सादर करावा लागतो. अर्जासोबत मृत्यू प्रमाणपत्र, अपत्यांचे जन्म दाखले, रहिवासी दाखला, रेशनकार्ड, ओळखपत्र तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असते.

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी व पडताळणी झाल्यानंतरच लाभ मंजूर केला जातो.

ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना या योजनेची माहिती नसल्यामुळे पात्र असूनही लाभ मिळत नाही, अशी स्थिती दिसून येते. त्यामुळे मातामृत्यू झालेल्या कुटुंबांनी तातडीने आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा: दुर्धर आजारांसाठी सांगली जिल्हा परिषदेची ‘राजारामबापू पाटील आर्थिक मदत योजना’; ग्रामीण रुग्णांना आर्थिक मदत.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा