सांगली : ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ प्रभावीपणे राबवण्यासाठी सांगली जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामपंचायतींच्या कामकाजाचा आढावा घेतला. अभियानातील कामात हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा बैठकीत देण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे यांनी तालुका विस्तार अधिकारी व ग्रामसेवकांना विविध घटकांवर काटेकोरपणे काम करण्याच्या सूचना दिल्या. गुणांकनाच्या निकषांनुसार काम पूर्ण करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
ग्रामपंचायतींच्या कामगिरीचा थेट परिणाम जिल्ह्याच्या राज्यस्तरीय मूल्यांकनावर होत असल्याने प्रशासनाने याबाबत कडक भूमिका घेतल्याचे बैठकीतून दिसून आले. कामात कसूर आढळल्यास संबंधितांना नोटीस बजावण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, ‘माझी वसुंधरा 5.0’ अभियानातील कामगिरीबद्दल सांगली जिल्हा परिषदेला यापूर्वी राज्यात प्रथम क्रमांक मिळाला असून, त्या पार्श्वभूमीवर पंचायतराज अभियानातही उच्च गुणांकन मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा: वाळवा तालुक्यातील देवर्डेत कारची दुचाकीला जोरदार धडक; तिघे गंभीर जखमी.
- विश्रामबाग मंगळवार बाजार चौकात नाला तुंबण्याची भीती; नाल्यात झाडी वाढल्याने सांडपाण्याच्या प्रवाहात अडथळा
- जतचा दुष्काळ लवकरच संपणार? 65 गावांना पाणी, 26,500 हेक्टर सिंचनाचा मार्ग मोकळा
- राज्यात 2000 नवीन ग्रंथालयांना मान्यता; सांगलीतील ग्रंथोत्सवात पालकमंत्र्यांची घोषणा
- आटपाडीत दुकानफोडी; दिघंचीतील इलेक्ट्रिकल दुकान फोडून 70 हजारांचा माल लंपास
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष









