सांगली : ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ प्रभावीपणे राबवण्यासाठी सांगली जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामपंचायतींच्या कामकाजाचा आढावा घेतला. अभियानातील कामात हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा बैठकीत देण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे यांनी तालुका विस्तार अधिकारी व ग्रामसेवकांना विविध घटकांवर काटेकोरपणे काम करण्याच्या सूचना दिल्या. गुणांकनाच्या निकषांनुसार काम पूर्ण करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
ग्रामपंचायतींच्या कामगिरीचा थेट परिणाम जिल्ह्याच्या राज्यस्तरीय मूल्यांकनावर होत असल्याने प्रशासनाने याबाबत कडक भूमिका घेतल्याचे बैठकीतून दिसून आले. कामात कसूर आढळल्यास संबंधितांना नोटीस बजावण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, ‘माझी वसुंधरा 5.0’ अभियानातील कामगिरीबद्दल सांगली जिल्हा परिषदेला यापूर्वी राज्यात प्रथम क्रमांक मिळाला असून, त्या पार्श्वभूमीवर पंचायतराज अभियानातही उच्च गुणांकन मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा: वाळवा तालुक्यातील देवर्डेत कारची दुचाकीला जोरदार धडक; तिघे गंभीर जखमी.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










