सांगली : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या संभाव्य युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा प्रशासनाने नागरिकांसाठी विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे. आखाती किंवा पश्चिम आशियाई देशांत वास्तव्यास असलेल्या नातेवाईकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती हवी असल्यास नागरिकांनी प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.
जिल्हा प्रशासनाने मंत्रालय, मुंबई येथील आपत्कालीन संचालन केंद्राशी (EOC) समन्वय साधला असून, प्राप्त चौकशी मंत्रालय नियंत्रण कक्षामार्फत संबंधित भारतीय दूतावासाकडे पाठविली जाणार आहे. त्यानंतर मिळालेली माहिती संबंधित नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक:
- जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली : 0233-2600500
- सांगली पोलीस नियंत्रण कक्ष : 0233-2672100
- मंत्रालय नियंत्रण कक्ष, मुंबई : 9321587143
आखाती देशांमध्ये नातेवाईक असलेल्या सांगली जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यकतेनुसार या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










