सांगली : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या संभाव्य युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा प्रशासनाने नागरिकांसाठी विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे. आखाती किंवा पश्चिम आशियाई देशांत वास्तव्यास असलेल्या नातेवाईकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती हवी असल्यास नागरिकांनी प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.
जिल्हा प्रशासनाने मंत्रालय, मुंबई येथील आपत्कालीन संचालन केंद्राशी (EOC) समन्वय साधला असून, प्राप्त चौकशी मंत्रालय नियंत्रण कक्षामार्फत संबंधित भारतीय दूतावासाकडे पाठविली जाणार आहे. त्यानंतर मिळालेली माहिती संबंधित नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक:
- जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली : 0233-2600500
- सांगली पोलीस नियंत्रण कक्ष : 0233-2672100
- मंत्रालय नियंत्रण कक्ष, मुंबई : 9321587143
आखाती देशांमध्ये नातेवाईक असलेल्या सांगली जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यकतेनुसार या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
- इस्राईल-इराण तणाव; दुबईला गेलेल्या कुपवाडमधील 30–35 पर्यटकांशी संपर्क, सुरक्षिततेबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू
- सांगली मनपाच्या पहिल्या महासभेत मोठा निर्णय; 30 कोटींच्या नाट्यगृहाला मंजुरी, स्थायी समिती गठीत
- आखाती देशांतील तणाव; सांगलीत नियंत्रण कक्ष सुरू, हेल्पलाईन क्रमांक जाहीर
- सांगली जिल्ह्यातील समाजसेवकांसाठी मोठी संधी; राज्यातील 7 प्रतिष्ठित पुरस्कारांसाठी 15 मार्चपर्यंत अर्ज करता येणार
- शिराळ्यात सरपंचांच्या पतीवर डेअरीत घुसून हल्ला; लोखंडी गजाने डोक्यात वार, राणीहार व 90 हजार रोख रक्कम गायब
- सांगली–मिरजमध्ये माजी सैनिकांसाठी सुरक्षा रक्षक भरती; 12 मार्च शेवटची तारीख









