सांगली : शेतकऱ्यांना भाजीपाला रोपवाटिका सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत प्रकल्प खर्चावर 50 टक्के अनुदान दिले जाणार असून 2 लाख 77 हजार 500 रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळू शकते.
या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याकडे किमान 0.40 हेक्टर स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे. तसेच रोपवाटिका उभारण्यासाठी कायमस्वरूपी पाण्याची सुविधा असणे गरजेचे आहे.
भाजीपाला रोपवाटिकेमुळे शेतकऱ्यांना पूरक व्यवसायाची संधी मिळून उत्पन्न वाढण्यास मदत होऊ शकते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा: आटपाडीतील तरुणांचा ‘फुला’ चित्रपट; राजीव खांडेकर यांच्या उपस्थितीत पोस्टर व संगीत प्रकाशन सोहळा.
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी










