सांगली : शहरातील मुख्य जलवाहिनीला लागलेली गळती दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून यामुळे शनिवार (21 मार्च) रोजी काही भागांतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
माधवनगर रस्ता परिसरातील 450 एम.एम. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याचे समजल्यानंतर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. हे काम आज रात्रीपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
या कामामुळे पाणी साठवणुकीवर परिणाम होणार असल्याने वॉर्ड क्रमांक 9, 10, 11 आणि 12 तसेच खणभाग, गावभाग, वखारभाग, पेठभाग, गणेशनगर आणि डॉ. आंबेडकर नगर या भागांत पाणी कमी दाबाने किंवा मर्यादित स्वरूपात येण्याची शक्यता आहे.
नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेकडून आवश्यक ठिकाणी मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, ही दुरुस्ती भविष्यातील पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महत्त्वाची असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
हेही वाचा: सांगलीत महिलांसाठी मोठी संधी; 900 महिलांना व्यवसाय प्रशिक्षण, 1.62 कोटींचा निधी.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










