Jat News Today : जत तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान; त्वरित नुकसानभरपाई न दिल्यास आंदोलनाचा इशारा

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
Jat Taluka Avkali Paus Nuksan Vikramsinh Sawat

Jat News Today | जत (सांगली): जत तालुक्यात गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी थेट माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांना भेटून आपली व्यथा मांडली. विक्रमसिंह सावंत यांनी शेतकऱ्यांची समस्या गांभीर्याने घेत प्रशासनाकडे त्वरित मदतीची मागणी केली आहे.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांवरचे आर्थिक संकट आणखी गडद झाले आहे. बैठकीत शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी थेट विक्रमसिंह सावंत यांच्या समोर मांडल्या. यानंतर सावंत यांनी शासनाने सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी याबाबत उपविभाग कार्यालय जत येथे निवेदन दिले.

मा आमदार सावंत म्हणाले की, “शेतकऱ्यांची अवस्था गंभीर आहे. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई न दिल्यास शासनाला जाग आणण्यासाठी आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही.”

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते आमदार जयंत पाटील यांनी, राज्यात गेल्या दोन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून यावर उपाय म्हणून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत द्यावी अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.

Jat Taluka Avkali Paus Nuksan Vikramsinh Sawat
Photo Courtesy: Instagram / @mla.vikramsawant

हेही वाचा: सांगलीत 28 सप्टेंबर रोजी ‘नमो रन मॅरेथॉन 2025’.

TAGGED:
Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा