सांगली : कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पाण्याचा आधार मिळावा यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून ‘मागेल त्याला शेततळे’ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून पावसाचे पाणी साठवून शेतीसाठी वापरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
शेततळ्यामुळे पावसाचे पाणी साठवून ठेवता येते आणि दुष्काळी परिस्थितीतही पिकांना पाणी देता येते. त्यामुळे कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना उपयुक्त ठरत असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याच्या नावे किमान 0.40 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्याने यापूर्वी शासनाच्या शेततळे योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
इच्छुक शेतकरी www.mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
हेही वाचा: दृष्टी नसली तरी जिद्द मोठी! सांगलीत अंध मुलांचा थरारक क्रिकेट सामना; शिवनेरी संघाचा 7 धावांनी विजय.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










