Sangli : भुकेल्या लेकरांच्या आक्रोशाला सरकारच मौन – माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांची टीका

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
Vikramsingh Sawant Emotional Post Sangli

Sangli Politics News | सांगली : काँग्रेसचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत राज्य सरकारवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “जत तालुक्यात करजगीत साप चाव्याने एक जीव गेला, बोर नदीत एका वृद्ध महिलेचा बुडून मृत्यू झाला, बिरनाळमध्ये एका तरुणाचा हृदयद्रावक मृत्यू झाला. अशा एकामागून एक दुर्देवी घटना घडल्या आहेत, पण आजही त्यांच्या वारसांच्या डोळ्यातले अश्रू पुसायला कोणी आलेल नाही.”

सावंत यांनी पुढे म्हटल की, “वारसांच्या घरात भुकेली लेकर आहेत, शेतकरी हतबल होऊन कर्जाच्या जाळ्यात अडकले आहेत आणि सत्ताधारी मात्र मौन बाळगून बसले आहेत. आपत्कालीन मदत निधीतून त्यांना तातडीची मदत मिळायला हवी होती, परंतु सात महिने उलटून गेले तरी त्यांना अजून एक रुपयाही मिळालेला नाही.”

सरकारच्या असंवेदनशीलतेवर टीका करताना त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “पूर्वी काही तासांत मदत पोहोचायची, पण आज सत्ताधाऱ्यांना गरीब जनतेकडे लक्ष द्यायला वेळ नाही. ही असंवेदनशीलता सहन केली जाणार नाही. जनतेचा संताप पेट घेतल्यास या सरकारला जनतेच्या रोषाला सामोर जाव लागेल.”

सावंत यांनी आपल्या पोस्टमध्ये शेवटी स्पष्ट शब्दांत म्हटल आहे की, “मी वारसांच्या न्यायासाठी, त्यांच्या हक्कासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा देईन. सरकारने तातडीने जाग व्हाव, अन्यथा जनता उत्तर देईल.”

हेही वाचा : राज्यातील 30 हून अधिक जिल्ह्यांना हवामान विभागाने दिला पावसाचा यलो अलर्ट.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा