Sangli News : कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य संशयित समीर गायकवाडचा सांगलीत मृत्यू

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
कॉ. गोविंद पानसरे आणि पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य संशयित समीर गायकवाड | फोटो : संकलन – Sangli Today

Govind Pansare Murder Case Sameer Gaikwad Death | सांगली : ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित समीर गायकवाड याचा आज, २० जानेवारी २०२६ रोजी सांगलीत मृत्यू झाला. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सांगली येथील शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) त्याच्यावर उपचार सुरू होते.

मिळालेल्या माहितीनुसार, समीर गायकवाड याची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला तातडीने सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

समीर गायकवाड हा १६ फेब्रुवारी २०१५ रोजी कोल्हापुरात झालेल्या कॉ. गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी होता. उपचारादरम्यान कॉ. पानसरे यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

या प्रकरणात समीर गायकवाडला २०१५ मध्ये सांगलीतून अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो अनेक वर्षे कारागृहात होता. न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्याला जामीन मंजूर झाला होता आणि तो सध्या जामिनावर बाहेर होता. पानसरे हत्या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात अद्याप सुरू आहे.

हेही वाचा: चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स च्या वार्षिक क्रीडा स्पर्धा 2025–26 सुरु.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा