अमेरिकेबरोबरच्या व्यापार करारावर आ. जयंत पाटील यांची प्रतिक्रिया; शेतकऱ्यांवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
भारत–अमेरिका व्यापार करारावर प्रतिक्रिया देताना आ. जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांबाबत चिंता व्यक्त केली. (छायाचित्र : सोशल मीडिया)

ईश्वरपूर (ता. वाळवा) : भारत आणि अमेरिकेदरम्यान झालेल्या नव्या अंतरिम व्यापार कराराबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व आमदार जयंत पाटील यांनी चिंता व्यक्त केली आहे. या करारामुळे भारतातील शेतकरी आणि शेती क्षेत्र अडचणीत येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी ईश्वरपूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आ. जयंत पाटील म्हणाले की, या करारामुळे अमेरिकेतील शेतमाल आणि दुग्धजन्य पदार्थ कमी दरात भारतात आले, तर देशातील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहू शकते. आधीच अनेक अडचणींना सामोरे जाणारा भारतीय शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेती करणाऱ्या अमेरिकेतील शेतकऱ्यांशी स्पर्धा कशी करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

भारतातील शेतकऱ्यांकडे आधुनिक शेतीसाधनांचा अभाव आणि मर्यादित भांडवल असल्याचे सांगत, अशा परिस्थितीत परदेशी स्वस्त आयात शेतकऱ्यांसाठी घातक ठरू शकते, असे मत त्यांनी मांडले. दुग्धजन्य पदार्थ व शेतमाल कमी दरात आयात झाल्यास देशातील शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होईल आणि त्यामुळे शेतकरी संकटात येईल, अस ते म्हणाले.

या संपूर्ण करारावर संसदेत सविस्तर चर्चा व्हावी आणि सरकारने कराराबाबत अधिक स्पष्टता द्यावी, अशी मागणी आ. जयंत पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार, या अंतरिम भारत–अमेरिका व्यापार करारात भारतातील संवेदनशील कृषी व दुग्धजन्य उत्पादनांना संरक्षण देण्यात आले आहे. गहू, तांदूळ, मका, डाळी तसेच दूध, दही, तूप आणि इतर दुग्धजन्य पदार्थांवर कोणतीही सवलत देण्यात आलेली नसल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा: मिरज तालुक्यातील माधवनगरमध्ये मतदानावर बहिष्कार; मूलभूत सुविधाच नसल्याने नागरिकांचा निषेध.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा