माधवनगरमध्ये पाच दिवस पाणीपुरवठा बंद; मतदारांच्या नाराजीचा मतदानावर परिणाम झाल्याची चर्चा सुरू

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
माधवनगर परिसरात पाणीपुरवठा खंडित राहिल्याने नागरिकांमध्ये नाराजी.

मिरज : सांगली शहरालगतच्या माधवनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित राहिल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून त्याचे पडसाद स्थानिक निवडणूक मतदानावर उमटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

माधवनगरमध्ये सुमारे सलग पाच दिवस पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांना गैरसोयींचा मोठा सामना करावा लागला. निवडणुकीच्या दिवशी सकाळी काही ठिकाणी पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाला असला तरी या कालावधीत झालेल्या त्रासाबद्दल स्थानिकांमधून असंतोष व्यक्त करण्यात येत होता.

“पाणीपुरवठा नियमित नसल्याने दैनंदिन कामांवर परिणाम झाला. प्रशासनाने याकडे वेळेत लक्ष द्यायला हवे होते,” अशी भावना काही स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.

उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार, माधवनगरमध्ये दुपारपर्यंत मतदानाची टक्केवारी तुलनेने कमी राहिल्याचे सांगितले जाते. काही प्रभागांमध्ये मतदान सुमारे 45 टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिल्याचे सांगितले जाते, तर इतर भागांत सरासरी 52 ते 55 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.

दरम्यान, शेजारच्या बुधगाव, कवलापूर, बिसूर, कावजी खोतवाडी आणि वाजेगाव परिसरात मात्र मतदानासाठी नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद दिसून आला. संबंधित जिल्हा परिषद मतदारसंघात विविध पक्षांच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत झाल्याने निकालाबाबत उत्सुकता कायम आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडून नियमित व सुरळीत पाणी पुरवठ्याची अपेक्षा व्यक्त केली असून, या प्रश्नाचा निवडणुकीच्या निकालावर कितपत आणि काय परिणाम होतो याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेचा 28 वा वर्धापन दिन आज; मुख्यालयात सकाळी 10.30 वाजता दीपप्रज्वलन कार्यक्रम.

TAGGED:
Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा