Sangli Crime : विवाहितेचे अपहरण; घरात घुसून पती व नातेवाईकांना मारहाण

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
प्रातिनिधिक छायाचित्र : Sangli Today

ईश्वरपूर : नेर्ले (ता. वाळवा) येथे प्रेमविवाह केल्याच्या रागातून विवाहितेचे अपहरण झाल्याची गंभीर घटना गुरुवारी मध्यरात्री घडल्याची नोंद कासेगाव पोलिस ठाण्यात झाली आहे. या घटनेत पतीसह सासू आणि दिराला मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नम्रता युवराज माने (वय १९) आणि युवराज बाळासाहेब माने (वय ४०, रा. नेर्ले) यांनी तीन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. या विवाहाला मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता, असे तक्रारीत नमूद आहे.

फिर्यादीनुसार, गुरुवारी रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास तीन वाहनांमधून आलेल्या काही जणांनी माने यांच्या घरात प्रवेश केला. दरवाजा तोडून आत शिरल्यानंतर पती युवराज माने यांना काठ्या व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. आरडाओरड ऐकून मदतीसाठी धावून आलेल्या आई सुमन माने आणि भाऊ धनाजी माने यांनाही मारहाण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या घटनेनंतर नम्रता माने यांना जबरदस्तीने नेण्यात आल्याचा आरोप पतीने केला आहे. याप्रकरणी नम्रताचे वडील, आई यांच्यासह अन्य काही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस तपास सुरू आहे.

कासेगाव पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून, विवाहितेचा शोध घेण्यासाठी पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: तासगावजवळ पिस्तूल विक्रीचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला; तरुणाकडून दोन पिस्तूले व जिवंत काडतूस जप्त.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा