ईश्वरपूर : पेठ-सांगली मार्गावरील ईश्वरपूर बसस्थानक परिसरात सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात 50 वर्षीय पादचारी ध्रुवकुमार मधुकर कदम (रा. मसुचीवाडी) यांचा मृत्यू झाला. ते दिव्यांग असून पेन्शन काढण्यासाठी ईश्वरपूरला आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ध्रुवकुमार कदम हे बसस्थानकातून बाहेर पडून बँकेकडे चालत जात असताना पेठकडून येणाऱ्या दुचाकीने (एमएच 10 एटी 5767) त्यांना जोरदार धडक दिली. धडकेत ते रस्त्यावर पडले व त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
या अपघातात दुचाकी चालक संग्राम रामदास पाटील (वय 24, रा. बुधगाव, ता. मिरज) हाही गंभीर जखमी झाला. दोघांनाही तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान दुपारी ध्रुवकुमार कदम यांचा मृत्यू झाला.
कदम यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. ईश्वरपूर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा: २५० कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न; राजवाड्यात खोकी हटवण्यावरून महापालिका-व्यावसायिक आमनेसामने.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










