ईश्वरपूर : पेठ-सांगली मार्गावरील ईश्वरपूर बसस्थानक परिसरात सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात 50 वर्षीय पादचारी ध्रुवकुमार मधुकर कदम (रा. मसुचीवाडी) यांचा मृत्यू झाला. ते दिव्यांग असून पेन्शन काढण्यासाठी ईश्वरपूरला आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ध्रुवकुमार कदम हे बसस्थानकातून बाहेर पडून बँकेकडे चालत जात असताना पेठकडून येणाऱ्या दुचाकीने (एमएच 10 एटी 5767) त्यांना जोरदार धडक दिली. धडकेत ते रस्त्यावर पडले व त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
या अपघातात दुचाकी चालक संग्राम रामदास पाटील (वय 24, रा. बुधगाव, ता. मिरज) हाही गंभीर जखमी झाला. दोघांनाही तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान दुपारी ध्रुवकुमार कदम यांचा मृत्यू झाला.
कदम यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. ईश्वरपूर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा: २५० कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न; राजवाड्यात खोकी हटवण्यावरून महापालिका-व्यावसायिक आमनेसामने.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










