वाळवा : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर केदारवाडी परिसरात झालेल्या अपघातात ट्रक चालक संजय एकनाथ साळुंखे (रा. दाबकेघर, ता. खंडाळा, जि. सातारा) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
9 फेब्रुवारी रोजी फलटण येथून माल भरून शिमोगा (कर्नाटक)कडे निघालेल्या साळुंखे यांचा ट्रक 10 फेब्रुवारीच्या पहाटे केदारवाडी परिसरात आला असता हा अपघात घडला.
हायवेवरील पहिल्या लेनमध्ये एक ट्रक उभा होता. मात्र त्या ट्रकला कोणतेही पार्किंग लाईट किंवा मागे इशारा देणारे बॅरेकेट लावलेले नव्हते. त्यामुळे तो ट्रक न दिसल्याने साळुंखे यांच्या ट्रकने त्याला मागून जोरात धडक दिली.
या अपघातात साळुंखे गंभीर जखमी झाले. सुरुवातीला कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले, त्यानंतर त्यांना पुण्यात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान 27 फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी निष्काळजीपणे रस्त्यावर ट्रक उभा करणारा चालक आरीफ मोनस अली (रा. उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध कासेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: सांगलीत पुढील 3 तासांत पावसाची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी










