सांगली : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर तसेच सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणुकीसाठी लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेमुळे सांगली जिल्ह्यात पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. जिल्हाभरात तसेच महापालिका हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी व वाहन तपासणी सुरू करण्यात आली असून, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्वतः काही प्रमुख चौकांना भेट देऊन बंदोबस्ताची पाहणी केली.
पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 15 डिसेंबरपासून महापालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू आहे. त्या अनुषंगाने सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांमध्ये स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम (SST) कार्यरत असून, जिल्ह्यातील प्रमुख प्रवेश मार्ग, चौक आणि संवेदनशील ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले आहे.
नवीन वर्षाच्या निमित्ताने नागरिक आणि युवक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतात. या काळात कुठेही बेकायदेशीर कृत्य, हुल्लडबाजी, मद्यधुंद वाहनचालना किंवा आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी पोलीस विभागाकडून ब्रेथ अॅनालायझरच्या माध्यमातून तपासणी केली जात आहे. मोटार वाहन कायद्याचे नियम काटेकोरपणे राबवले जात असून, नियमभंग करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
सांगली जिल्ह्यातील एकूण 25 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी सुरू असून, सांगली आणि मिरज या उपविभागांतील सहा पोलीस हद्दींमध्ये विशेष दक्षता घेण्यात आली आहे. कोणीही अफवा पसरवत असल्यास किंवा कोणताही संशयास्पद प्रकार आढळल्यास नागरिकांनी तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नवीन वर्षाचे स्वागत शांततेत, नियमांचे पालन करत आणि सुरक्षित वातावरणात करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले असून, नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
हेही वाचा: सांगली एसटी आगाराला मिळाल्या 100 नव्या बसेस; मात्र बसटंचाईचा प्रश्न कायम.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










