सांगली : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या संभाव्य युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा प्रशासनाने नागरिकांसाठी विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे. आखाती किंवा पश्चिम आशियाई देशांत वास्तव्यास असलेल्या नातेवाईकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती हवी असल्यास नागरिकांनी प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.
जिल्हा प्रशासनाने मंत्रालय, मुंबई येथील आपत्कालीन संचालन केंद्राशी (EOC) समन्वय साधला असून, प्राप्त चौकशी मंत्रालय नियंत्रण कक्षामार्फत संबंधित भारतीय दूतावासाकडे पाठविली जाणार आहे. त्यानंतर मिळालेली माहिती संबंधित नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक:
- जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली : 0233-2600500
- सांगली पोलीस नियंत्रण कक्ष : 0233-2672100
- मंत्रालय नियंत्रण कक्ष, मुंबई : 9321587143
आखाती देशांमध्ये नातेवाईक असलेल्या सांगली जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यकतेनुसार या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










