Sangli News | सांगली : महापालिका, विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक जवळ आली की सांगलीच्या विकासाबाबत मोठमोठी आश्वासने दिली जातात. विमानतळ, औद्योगिक विकास, रोजगार, रस्ते, पायाभूत सुविधा यांसारखे मुद्दे पुन्हा चर्चेत येतात. मात्र निवडणूक पार पडताच हे विषय हळूहळू मागे पडतात, असा अनुभव अनेक सांगलीकर व्यक्त करत आहेत.
अलीकडेच सोशल मीडियावर नागरिकांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केली असून, “निवडणूक झाली की पुन्हा सांगली वाऱ्यावर” अशी प्रतिक्रिया उमटत आहे. कोणताही राजकीय पक्ष असो किंवा कोणताही नेता — निवडणुकीच्या काळात विकासाची भाषा आणि निवडणुकीनंतरची शांतता, हे चित्र अनेक वर्षांपासून कायम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
विशेषतः सांगली–मिरज–कुपवाड परिसराच्या विकासाबाबत विमानतळ, औद्योगिकीकरण आणि रोजगारनिर्मिती या मुद्द्यांवर वारंवार आश्वासने दिली जातात. मात्र प्रत्यक्षात या बाबतीत ठोस प्रगती होताना दिसत नसल्याने तरुण वर्गात नाराजी वाढताना दिसते.
“पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिकसारख्या शहरांचा वेगाने विकास झाला; मात्र सांगलीकडे कायम दुर्लक्ष झाले,” अशी भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. रस्ते, ड्रेनेज, पार्किंग, पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी यांसारख्या मूलभूत प्रश्नांवरही निवडणुकीनंतर अपेक्षित गती दिसून येत नसल्याचा आरोप आहे.
नागरिकांच्या मते, विकास म्हणजे फक्त भाषण किंवा घोषणा नाही, तर सातत्याने होणारी कामे आणि परिणाम दिसणे आवश्यक आहे.
दरम्यान, येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा विकासाचे मुद्दे चर्चेत येत असताना, यावेळी तरी केवळ आश्वासने न राहता प्रत्यक्ष कामे होतील का, याकडे सांगलीकरांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: सांगलीत आज सोन्याचा दर किती? 2026 मध्ये दर कुठपर्यंत जाऊ शकतो – तज्ञांच मत काय.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










