सांगली : वाढता शेती खर्च आणि अनिश्चित बाजारभाव यामुळे अनेक शेतकरी पूरक उत्पन्नाच्या शोधात आहेत. अशा पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात 11 मार्च 2026 पर्यंत ‘महारेशीम अभियान’ राबवले जात आहे. या मोहिमेदरम्यान रेशीम शेतीसाठी थेट मार्गदर्शन आणि 2026-27 हंगामासाठी नोंदणीची सुविधा उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्यातील गावोगावी विशेष ‘रेशीम रथ’ फिरणार असून जत, कवठेमहांकाळ, मिरज, खानापूर, तासगाव, आटपाडी आणि पलूस तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष माहिती दिली जाणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांना लागवड पद्धती, किड नियंत्रण, उत्पादन प्रक्रिया आणि संभाव्य उत्पन्नाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
रेशीम उद्योग कमी क्षेत्रात सुरू करता येतो आणि पारंपरिक पिकांसोबत पूरक व्यवसाय म्हणून करता येतो. त्यामुळे लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी हा पर्याय उपयोगी ठरू शकतो.
11 मार्चपर्यंत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी नियोजनबद्ध मार्गदर्शन मिळणार आहे.
हेही वाचा: 20 फेब्रुवारी अंतिम मुदत: सांगली जिल्ह्यातील बौद्ध समाजातील संस्थांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










