२५० कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न; राजवाड्यात खोकी हटवण्यावरून महापालिका-व्यावसायिक आमनेसामने

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
सांगलीतील राजवाडा चौकात अनेक वर्षांपासून सुरू असलेली खोकी. | छायाचित्र : सांगली टुडे

सांगली : शहराच्या मध्यभागी असलेल्या राजवाडा चौकात शनिवारी अतिक्रमण हटवण्यावरून तणावाचे वातावरण निर्माण झाले. महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक खोकी हटवण्यासाठी राजवाडा चौकात दाखल झाले; मात्र संबंधित जागा गणपती पंचायतन संस्थानची खासगी मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कारवाई थांबवण्यात आली.

राजवाडा परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून स्टॅम्प विक्रेते, टायपिस्ट, झेरॉक्स, चहा-नाष्टा व्यावसायिक तसेच दस्त नोंदणीशी संबंधित सेवा देणारे व्यवसाय सुरू आहेत. या छोट्या व्यवसायांमधून सुमारे २५० ते ३०० कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो, असे स्थानिक व्यवसायिकांनी सांगितले.

अतिक्रमण हटवण्यासाठी शनिवारी सकाळी महापालिकेचे पथक येथे पोहोचले. मात्र खोकी ज्या जागेवर आहेत ती गणपती पंचायतन संस्थानाची खासगी मालमत्ता असून संबंधितांना भाडेपट्टीवर जागा देण्यात आल्याचे पंचायतन व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले.

पंचायतनचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांनी संबंधित जागा पंचायतनच्या खासगी मालकीची असल्याचे स्पष्ट केल्यानंतर महापालिका पथकाने कारवाई स्थगित करत माघार घेतली. या घटनेनंतर शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली असून, खासगी मालमत्ता आणि सार्वजनिक अतिक्रमण याबाबत स्पष्ट निकष काय आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा: 18 लाखांचे द्राक्षे नेले, 11 लाख बुडवले; बेडगच्या द्राक्ष बागायतदाराची व्यापाऱ्याकडून फसवणूक.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा