सांगली : शहरातील मुख्य जलवाहिनीला लागलेली गळती दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून यामुळे शनिवार (21 मार्च) रोजी काही भागांतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
माधवनगर रस्ता परिसरातील 450 एम.एम. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याचे समजल्यानंतर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. हे काम आज रात्रीपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
या कामामुळे पाणी साठवणुकीवर परिणाम होणार असल्याने वॉर्ड क्रमांक 9, 10, 11 आणि 12 तसेच खणभाग, गावभाग, वखारभाग, पेठभाग, गणेशनगर आणि डॉ. आंबेडकर नगर या भागांत पाणी कमी दाबाने किंवा मर्यादित स्वरूपात येण्याची शक्यता आहे.
नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेकडून आवश्यक ठिकाणी मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, ही दुरुस्ती भविष्यातील पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महत्त्वाची असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
हेही वाचा: सांगलीत महिलांसाठी मोठी संधी; 900 महिलांना व्यवसाय प्रशिक्षण, 1.62 कोटींचा निधी.
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी










