सांगली : शहरातील महिला बचत गटांच्या कामाची दखल थेट दिल्लीत घेण्यात आली असून ‘अमृत मित्र’ कार्यक्रमात सांगलीच्या ७ महिलांचा गौरव करण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या ‘अमृत २.०’ अभियानांतर्गत नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित कार्यक्रमात सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या महिला प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमात विविध राज्यांतील महिला बचत गटांसमोर सांगलीतील कामाचा उल्लेख करण्यात आला.
तेजस्विनी आणि समर्थ महिला बचत गटातील शारदा माळी, संगीता मंडले, राजश्री कोरे, वैशाली कोळी, वैशाली सर्वदे, सुलोचना कोळी आणि रेश्मा कांबळे या महिलांचा यावेळी गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमामुळे महिलांना देशभरातील बचत गटांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. तसेच स्वच्छता, उद्यान देखभाल आणि संबंधित कामांमध्ये व्यवसाय अधिक प्रभावीपणे कसा वाढवावा याबाबत मार्गदर्शन मिळाले.
महानगरपालिकेच्या पुढाकारातून महिलांना राष्ट्रीय स्तरावर काम सादर करण्याची संधी मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला असून इतर बचत गटांसाठीही ही प्रेरणादायी बाब ठरत आहे.
है वाचा: सांगलीत कंबरेला कोयता लावून फिरणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात; गुन्हा दाखल.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










