सांगली : येत्या दोन दिवसांत मुंबईत होणाऱ्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत सांगली जिल्हा परिषद सत्तास्थापनेचा अंतिम निर्णय होणार आहे. सोमवारी मिरजेतील शासकीय विश्रामधाम येथे झालेल्या महायुतीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी अध्यक्षपदासाठी स्पष्ट आग्रह धरल्याने सांगलीतील राजकीय समीकरण आणखी गुंतागुंतीचे झाले आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) नेत्यांमध्ये सत्तास्थापनेबाबत चर्चा झाली.
जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचे संख्याबळ ३० असून महाविकास आघाडीला बहुमतासाठी केवळ एका सदस्याची गरज आहे. दुसरीकडे भाजपकडे जनसुराज्य व रयत क्रांतीसह १८ सदस्य आहेत. स्पष्ट बहुमतासाठी महायुतीला अजून १३ सदस्यांची आवश्यकता आहे.
राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे ६ आणि शिवसेना (शिंदे गट) चे ७ सदस्य निवडून आल्याने हे दोन्ही गट सध्या ‘किंगमेकर’ भूमिकेत आहेत.
अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) गटाला संधी द्यावी, या मागणीवर घटक पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकीनंतरच होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
अध्यक्षपद, उपाध्यक्षपद आणि सभापती पदांवर तडजोड होणार की एखादा गट वेगळी भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे मुंबईतील बैठक सांगलीच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहे.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










