मुंबई : राज्यातील प्रलंबित महानगरपालिका निवडणुकांची घोषणा आज होण्याची दाट शक्यता असून, राज्य निवडणूक आयोगाकडून यासंदर्भात आज महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत महापालिका निवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून महापालिका निवडणुकांकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यास तत्काळ राज्यभर आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असून, त्यामुळे राजकीय हालचालींना अधिक वेग येणार आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सांगली, कोल्हापूरसह राज्यातील सुमारे 28 महानगरपालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. निवडणूक आयोगाने आवश्यक तयारी पूर्ण केली असून, प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मतदान 12 जानेवारीनंतर होण्याची शक्यता असून, त्यानंतर अल्पावधीतच मतमोजणी व निकाल जाहीर होऊ शकतात. आजच्या पत्रकार परिषदेकडे सर्वच राजकीय पक्षांचे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: अहिल्यादेवींच्या पुतळा लोकार्पणानिमित्त भाजपचे शक्तिप्रदर्शन, महापालिका निवडणुकीची नांदी.
- इराण-इस्रायल तणावामुळे तेल दर वाढणार? सांगलीत पेट्रोल 104.07 रुपये; सध्या दरवाढ नाही
- विटा-कराड मार्गावर भीषण अपघात; जखमी महिलेचा 10 दिवसांनी मृत्यू
- सांगली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीची निवड 13 मार्चला; इच्छुकांकडून मोर्चेबांधणी
- सांगलीत कृष्णा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर; ‘हजारो मासे मृत, 5 लाख नागरिकांच्या आरोग्यास धोका’
- कवठेमहांकाळमध्ये 2.88 किलो गांजा जप्त; तस्कर अटकेत
- सांगलीत ‘आमदार केसरी 2026’ भव्य बैलगाडी शर्यत; विजेत्यास 1 लाखांचे बक्षीस









