सांगली : गेल्या दोन दिवसांपासून सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका सुरू असून, जागावाटपाबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) यांनी जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांवर लक्ष केंद्रित करत प्रभागनिहाय चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर मंत्री मकरंद पाटील हे सांगलीत मुक्काम ठोकून असून, माजी मंत्री जयंत पाटील, खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजीत कदम यांच्याशी सलग चर्चा सुरू असल्याचे समजते. महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात सध्या कोणतीही अधिकृत आघाडी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसने सुमारे ३५ जागांवर, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) ने ३० जागांवर आपली भूमिका निश्चित केली असून, १७ ते १८ जागांवर अद्याप निर्णय प्रलंबित आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले असून, एबी फॉर्म लवकरच देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, मिरज शहरात मैत्रीपूर्ण लढतीचा विचार केला जात असला, तरी सांगली आणि कुपवाड भागात मैत्रीपूर्ण लढतीस नकार देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. त्यामुळे या दोन्ही भागांत थेट लढती होण्याची शक्यता अधिक असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज प्रक्रियेला वेग आलेला असून, पुढील एक-दोन दिवसांत महाविकास आघाडीतील जागावाटपाचे चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
हेही वाचा: सांगलीत भाजपविरोधात धारकऱ्यांचे बंड; उमेदवारीत डावलल्याने अपक्ष लढण्याचा पवित्रा.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










