Sangli Water Issue : विश्रामबाग–विद्यानगर–वारणाली परिसरात चार दिवसांपासून पाणीपुरवठा बंद; नागरिकांची मोठी गैरसोय

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
विश्रामबाग–विद्यानगर परिसरातील घरगुती नळाला पाणी नसल्याचे वास्तव | फोटो : Sangli Today

सांगली : सांगली शहरातील विश्रामबाग–विद्यानगर–वारणाली परिसरात गेल्या चार दिवसांपासून नळाद्वारे पाणीपुरवठा होत नसल्यामुळे परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पिण्याचे पाणी तसेच दैनंदिन घरगुती वापरासाठी पाणी मिळणे कठीण झाले असून अनेक कुटुंबांना पर्यायी मार्गांचा आधार घ्यावा लागत आहे.

परिसरातील अनेक ठिकाणी चौकाचौकात नाणे टाकून पाणी मिळणाऱ्या मशीनवर नागरिक पिण्यासाठी पैसे देऊन पाणी आणताना दिसत आहेत. मात्र आजच्या घडीला बहुतेक घरांमध्ये पूर्वीप्रमाणे मोठ्या प्रमाणात अतिरिक्त पाणी साठवून ठेवण्याची सवय राहिलेली नाही. त्यामुळे पाण्याच्या टाकीतील साठा संपल्यानंतर स्वयंपाक, स्वच्छता, आंघोळ यांसारख्या दैनंदिन कामांसाठी पाणी मिळवणे अवघड होत आहे.

ज्या घरांमध्ये खासगी बोअरवेलची सोय आहे, त्या नागरिकांना तुलनेने दिलासा मिळत असला तरी जे पूर्णपणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून आहेत, त्यांची परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदार कुटुंबांसमोर मोठी अडचण निर्माण झाली असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

पाणीपुरवठा खंडित होण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट नसले तरी लवकरात लवकर नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. पाणी ही मूलभूत गरज असल्याने संबंधित यंत्रणांनी ही समस्या गांभीर्याने घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

हेही वाचा: मी एकट्यान मतदान केल नाही तर काय होतय? माझ्या एका मतान काय बदलणार आहे….

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा