सांगली : सांगली शहरातील विश्रामबाग–विद्यानगर–वारणाली परिसरात गेल्या चार दिवसांपासून नळाद्वारे पाणीपुरवठा होत नसल्यामुळे परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पिण्याचे पाणी तसेच दैनंदिन घरगुती वापरासाठी पाणी मिळणे कठीण झाले असून अनेक कुटुंबांना पर्यायी मार्गांचा आधार घ्यावा लागत आहे.
परिसरातील अनेक ठिकाणी चौकाचौकात नाणे टाकून पाणी मिळणाऱ्या मशीनवर नागरिक पिण्यासाठी पैसे देऊन पाणी आणताना दिसत आहेत. मात्र आजच्या घडीला बहुतेक घरांमध्ये पूर्वीप्रमाणे मोठ्या प्रमाणात अतिरिक्त पाणी साठवून ठेवण्याची सवय राहिलेली नाही. त्यामुळे पाण्याच्या टाकीतील साठा संपल्यानंतर स्वयंपाक, स्वच्छता, आंघोळ यांसारख्या दैनंदिन कामांसाठी पाणी मिळवणे अवघड होत आहे.
ज्या घरांमध्ये खासगी बोअरवेलची सोय आहे, त्या नागरिकांना तुलनेने दिलासा मिळत असला तरी जे पूर्णपणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून आहेत, त्यांची परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदार कुटुंबांसमोर मोठी अडचण निर्माण झाली असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
पाणीपुरवठा खंडित होण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट नसले तरी लवकरात लवकर नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. पाणी ही मूलभूत गरज असल्याने संबंधित यंत्रणांनी ही समस्या गांभीर्याने घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.
हेही वाचा: मी एकट्यान मतदान केल नाही तर काय होतय? माझ्या एका मतान काय बदलणार आहे….
- बैलगाडी शर्यतीला गेलेल्या युवकाची मोटारसायकल चोरी; रेठरेधरण येथील घटना
- दिघंची बसस्थानकाजवळील दुकान फोडले; 1.21 लाखांचा ऐवज लंपास
- सांगली महानगरपालिका भरतीच्या नावाने फसवणूक? सोशल मीडियावरील जाहिराती खोट्या
- होळीच्या रात्री पुणे–बेंगलोर महामार्गावर हिट अँड रन; पेठनाक्याजवळ 55 वर्षीय वेटरचा मृत्यू
- इस्राईल-इराण तणाव; दुबईला गेलेल्या कुपवाडमधील 30–35 पर्यटकांशी संपर्क, सुरक्षिततेबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू
- सांगली मनपाच्या पहिल्या महासभेत मोठा निर्णय; 30 कोटींच्या नाट्यगृहाला मंजुरी, स्थायी समिती गठीत









