सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेसाठी आज, १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया सुरू असताना, प्रचार समाप्तीनंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने कोणताही नवीन आदेश जारी केलेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (MahaDGIPR) यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, जाहीर प्रचार संपल्यानंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यासंदर्भातील आदेश हा नवीन नसून, तो १४ फेब्रुवारी २०१२ रोजीच राज्य निवडणूक आयोगाने निर्गमित केलेला आहे.
सध्या समाजमाध्यमे व काही माध्यमांत प्रचार समाप्तीनंतर घरोघरी प्रचारासाठी नवीन नियम लागू करण्यात आल्याचे वृत्त प्रसारित होत आहे. मात्र, ते वृत्त वस्तुस्थितीला धरून नसल्याचे MahaDGIPR कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
२०१२ च्या आदेशानुसार, जाहीर प्रचार समाप्तीनंतर उमेदवार हे मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या बाहेर मतदारांना भेटून किंवा घरोघरी जाऊन प्रचार करू शकतात. मात्र, या काळात माईकचा वापर करता येणार नाही तसेच उमेदवारांना समूहाने फिरण्यास मनाई आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या या स्पष्टिकरणामुळे प्रचार नियमांबाबत पसरलेल्या गैरसमजांवर पडदा पडला असून, मतदारांनी व उमेदवारांनी अधिकृत आदेशांनुसारच वर्तन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा: आज १५ जानेवारी रोजी सांगलीत मतदान सुरू; मागील निवडणुकीतीचा निकाल, मतदान टक्केवारी व आकडेवारीवर एक नजर.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










