Sangli News : आरफळ कालव्यात बुडून सहा वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; आळसंद गावावर शोककळा

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
प्रातिनिधिक छायाचित्र : Sangli Today

विटा (जि. सांगली) : खानापूर तालुक्यातील आळसंद येथे आरफळ कालव्यात पडून सहा वर्षांच्या बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. राजवीर सोमनाथ जाधव (वय ६, रा. आळसंद) असे मृत बालकाचे नाव आहे. ही घटना १५ जानेवारी रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली.

राजवीर हा विटा–कुंडल रस्त्यावरील आरफळ कालव्यावरील पुलावर पाणी पाहत असताना अचानक तोल जाऊन कालव्यात पडला. कालव्यातील पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने काही क्षणांतच तो पाण्यात दिसेनासा झाला. ही घटना तेथून जाणाऱ्या काही महिलांनी पाहिली. त्यांनी आरडाओरड केली; मात्र त्या वेळी मदतीसाठी कोणीही पुरुष उपस्थित नसल्याने तातडीने बचाव करता आला नाही.

घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी आरफळ कालव्याच्या काठावर गर्दी केली. काही ग्रामस्थांनी पाण्यात उतरून शोधमोहीम सुरू केली. मात्र अनेक तास प्रयत्न करूनही यश आले नाही. अखेर घटनेच्या ठिकाणापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर कालव्यात राजवीरचा मृतदेह आढळून आला.

राजवीर हा जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीत शिकत होता. तो अभ्यासात हुशार, शांत स्वभावाचा आणि शिक्षकांचा लाडका विद्यार्थी होता. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण आळसंद गावात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा: सांगली–मिरज–कुपवाड महापालिकेत भाजप सर्वाधिक जागांवर विजयी; प्रभागनिहाय विजयी उमेदवारांची यादी.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा