प्रशासक काळात सांगली महापालिकेने काय केले? आयुक्त सत्यम गांधी यांनी सादर केले ‘रिपोर्ट कार्ड’

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत प्रशासक काळातील कामकाजाचा आढावा सादर करताना आयुक्त सत्यम गांधी (IAS) | फोटो : संकलन – Sangli Today

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रशासक काळात राबविण्यात आलेल्या कामकाजाचा विभागनिहाय व सांख्यिकीय आढावा महापालिका आयुक्त सत्यम गांधी (IAS) यांनी मंगळवारी विशेष पत्रकार परिषदेत सादर केला. ही परिषद महापालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात पार पडली.

या सादरीकरणात प्रशासक काळात सामान्य प्रशासन, आस्थापना, वित्त, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम, नगररचना, आरोग्य, स्वच्छता, प्राथमिक शिक्षण, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, दिव्यांग कल्याण, अग्निशमन, माहिती तंत्रज्ञान, कर वसुली, उद्यान, वाहतूक तसेच निवडणूक विभागांमार्फत राबविण्यात आलेल्या कामकाजाचा एकत्रित लेखाजोखा मांडण्यात आला.

आयुक्त गांधी यांनी सांगितले की, प्रशासक काळात निर्णयप्रक्रियेत नियमबद्धता, ई-गव्हर्नन्सचा वापर, फाईल ट्रॅकिंग व वेळबद्ध कामकाज यांवर भर देण्यात आला. सर्व विभागांमध्ये पारदर्शकता व उत्तरदायित्व राखून प्रशासन चालविण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी २०२५–२६ मधील सार्वत्रिक महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावाही मांडण्यात आला. निवडणूक विभागासह विविध विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे मतदान व मतमोजणी प्रक्रिया नियोजित पद्धतीने पार पडल्याची माहिती त्यांनी दिली.

कर्मचारी कल्याणाबाबत बोलताना, दीर्घकाळ प्रलंबित पदोन्नती, अनुकंपा नियुक्त्या व सेवाविषयक प्रकरणे नियमांनुसार पूर्ण करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. तसेच HRMS, सेवा पुस्तके अद्ययावत करणे, वेतन-भत्ते आणि शिस्तपालन प्रक्रियांमुळे प्रशासनातील कार्यक्षमता वाढल्याचा आढावा सादर करण्यात आला.

वित्त व कर विभागांमार्फत कर वसुली सुधारणा, थकबाकी व्यवस्थापन, खर्च नियंत्रण आणि ई-लेखा प्रणालीच्या माध्यमातून वित्तीय शिस्त बळकट करण्यावर भर देण्यात आल्याचेही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम, स्वच्छता व आरोग्य विभागांमार्फत राबविण्यात आलेल्या नागरी सेवांचा आढावाही यावेळी मांडण्यात आला.

हेही वाचा: सांगली–मिरज रेल्वे प्रवाशांना दिलासा; प्रजासत्ताक दिनानिमित्त धावणार विशेष रेल्वे.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा