शहर स्वच्छतेसाठी ‘सांगलीच्या भिंती बोलू लागल्यात’ उपक्रमातून जनजागृती

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
भित्तीचित्रांच्या माध्यमातून स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश; शहरातील भिंती झाल्या जनजागृतीचे माध्यम | फोटो : Sangli Today

सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेच्या वतीने शहर स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि नागरिक जागृतीसाठी ‘सांगलीच्या भिंती बोलू लागल्यात’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील मुख्य रस्ते, उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणच्या भिंतींवर स्वच्छता व पर्यावरण विषयक भित्तीचित्रे काढण्यात येत आहेत.

या भित्तीचित्रांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून, पूर्वी दुर्लक्षित असलेले सार्वजनिक कोपरे, रस्त्याकडेच्या भिंती आता सामाजिक संदेश देणारी दृश्य माध्यमे बनत आहेत. हा उपक्रम स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा अभियान तसेच National Clean Air Programme (NCAP) अंतर्गत राबवला जात आहे.

भित्तीचित्रांमधून प्लास्टिकमुक्त शहर, वृक्षारोपण, पाणी बचत, ओला व सुका कचरा वर्गीकरण, झिरो वेस्ट संकल्पना, प्रदूषण नियंत्रण, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर, सार्वजनिक वाहतूक तसेच आरोग्य व सार्वजनिक मालमत्तेच्या संरक्षणासंबंधी संदेश देण्यात येत आहेत.

या उपक्रमाबाबत प्रतिक्रिया देताना सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगितले की, स्वच्छता ही केवळ जबाबदारी न राहता ती नागरिकांची सवय आणि सांगलीची संस्कृती बनावी, यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल. शब्दांशिवाय बोलणारी चित्रकला नागरिकांच्या मनावर सकारात्मक परिणाम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पर्यावरण संवर्धन अधिकारी अजित गुजराथी यांनी सांगितले की, दृश्य माध्यमांचा प्रभाव मोठा असून भित्तीचित्रांद्वारे दिला जाणारा स्वच्छतेचा संदेश अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचेल. नागरिकांच्या सहभागातूनच स्वच्छ आणि सुंदर सांगली साकार होईल, अस ते म्हणाले.

महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे कि, नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करून टाकावा, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये आणि सांगली स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. 

हेही वाचा: ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर तासगाव तालुक्यातील एका गावाचा मतदानावर बहिष्कार.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा