सांगली : सांगली शहरात अवघ्या ३० रुपयांच्या माव्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाचा चाकूहल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
मृत तरुणाचे नाव नारायण सुरेश पवार (वय २८, रा. वडर गल्ली, सांगली) असे आहे. रविवारी शहरातील एका पानटपरीवर मावा देण्याच्या कारणावरून नारायण पवार याचा काही तरुणांशी वाद झाला होता. या वादातून संशयितांनी त्याच्यावर चाकूने हल्ला केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या नारायण पवार याला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला होता.
दरम्यान, अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी नारायण पवार याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर पोलिसांनी गुन्ह्याचे स्वरूप बदलून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील संशयित हे परस्पर नातलग असल्याची माहितीही पोलिसांकडून देण्यात आली आहे.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










