सांगली : सांगली शहरात अवघ्या ३० रुपयांच्या माव्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाचा चाकूहल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
मृत तरुणाचे नाव नारायण सुरेश पवार (वय २८, रा. वडर गल्ली, सांगली) असे आहे. रविवारी शहरातील एका पानटपरीवर मावा देण्याच्या कारणावरून नारायण पवार याचा काही तरुणांशी वाद झाला होता. या वादातून संशयितांनी त्याच्यावर चाकूने हल्ला केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या नारायण पवार याला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला होता.
दरम्यान, अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी नारायण पवार याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर पोलिसांनी गुन्ह्याचे स्वरूप बदलून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील संशयित हे परस्पर नातलग असल्याची माहितीही पोलिसांकडून देण्यात आली आहे.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










