उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे सांगली महापालिकेतील सत्तास्थापनेच्या हालचालींना ब्रेक

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे सांगली महापालिकेतील सत्ता समीकरणे थांबली | फोटो : Sangli Today

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे सांगलीसह राज्यातील काही महापालिकांमधील सत्तास्थापनेच्या हालचालींना अचानक ब्रेक लागला आहे. शोकाकुल वातावरणामुळे पुढील काही दिवस कोणताही अंतिम निर्णय होण्याची शक्यता कमी असून, पुढील आठवड्यातच सत्तास्थापनेबाबत हालचाली पुन्हा सुरू होतील, असे राजकीय वर्तुळातून सांगण्यात येत आहे.

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेतील महापौर व उपमहापौर निवडणूक 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सत्तास्थापनेसाठी विविध पातळ्यांवर चर्चा सुरू झाल्या होत्या. महापालिकेत भाजपचे 39 नगरसेवक असून, अवघ्या एका जागेमुळे बहुमत भाजपकडे नाही. त्यामुळे भाजपकडून शिवसेनेसोबत युतीबाबत चर्चा करण्यात आली होती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही याबाबत संकेत दिले होते.

मात्र स्थायी समितीत बहुमत मिळवण्यासाठी केवळ भाजप-शिवसेना युती पुरेशी ठरत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी अशी त्रिपक्षीय सत्ता रचना होण्याची शक्यता होती.

या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाल्याची माहिती होती. सांगली महापालिकेत एकत्र सत्तास्थापनेबाबत निर्णय जवळपास निश्चित झाल्याचे संकेत मिळाले होते. बुधवारी याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

मात्र बुधवारी सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी समोर आली, आणि संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. त्यांच्या निधनामुळे राज्यातील राजकीय वातावरण सुन्न झाले असून, सत्तास्थापनेसंबंधी सुरू असलेल्या सर्व हालचाली तात्पुरत्या थांबवण्यात आल्या आहेत.

दरम्यान, सांगली महापालिकेत महापौरपद भाजपकडे जाणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. शिवसेनेने उपमहापौर पदावर दावा केला आहे, तर राष्ट्रवादीकडून स्थायी समिती सभापतीपद व काही प्रभाग समित्यांवर हक्क सांगण्यात आला आहे. मात्र सध्याच्या शोककाळात सत्ता वाटपाबाबत कोणतीही अधिकृत भूमिका समोर आलेली नाही.

अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय निर्णय पुढे ढकलले जाणे हे स्वाभाविक असून, पुढील आठवड्यात वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: ईश्वरपूर पोलिसांची मोठी कारवाई; चार देशी पिस्तुले व काडतुसे जप्त, एक आरोपी अटकेत.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा