सांगली : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात खानापूर विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापले असून, भाजपचे जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेनेचे खानापूरचे आमदार सुहास बाबर यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.
एका माध्यमाशी बोलताना आमदार पडळकर यांनी सुहास बाबर यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याबाबत केलेले वक्तव्य अयोग्य असल्याचे सांगत त्याचा जाहीर निषेध केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळेच अनेक आमदार राजकारणात आले असल्याचा दावा करत, मुख्यमंत्र्यांबाबत केलेली टिप्पणी ही सत्तेच्या अहंकारातून आलेली असल्याचे पडळकर यांनी म्हटले.
वरिष्ठ नेत्यांनी मैत्रीपूर्ण लढतीच्या सूचना दिल्या असतानाही अशा प्रकारची वक्तव्ये करणे चुकीचे असल्याचे पडळकर म्हणाले. जिल्हा परिषद निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात मुख्यमंत्र्यांबद्दल अशी भाषा वापरणाऱ्यांना जनताच योग्य ते उत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला.
खानापूर मतदारसंघात भाजप कार्यकर्ते ताकदीने काम करत असून, कोणत्याही एका व्यक्तीमुळे कुठला पक्ष चालत नाही, असे सांगत पडळकर यांनी भाजपच्या संघटनात्मक ताकदीचा उल्लेख केला. पक्षाच्या कार्यकर्त्यांचा संघर्ष आणि नेतृत्वावरील विश्वास यामुळेच भाजप पक्ष मजबूत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या वक्तव्यांमुळे खानापूर विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना यांच्यातील राजकीय तणाव अधिक वाढत असून, निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून वर्तवली जात आहे.
हेही वाचा: सांगली जिल्हा बँक नोकरभरती प्रकरण; उच्च न्यायालयातील सुनावणी १३ फेब्रुवारीला.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










