सांगली : जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खानापूर विधानसभा मतदारसंघातील एका सभेत केलेल्या वक्तव्यामुळे शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्यावर भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली असून, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनीही बाबर यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत बाबर यांना सल्ला दिला आहे.
मुंबईत माध्यमांशी बोलताना महाजन यांनी, मुख्यमंत्र्यांचा एकेरी पद्धतीने उल्लेख करणे अयोग्य असल्याचे सांगितले. अशा प्रकारची भाषा राजकीय संस्कृतीला धरून नसल्याचे महाजन म्हणाले. सुहास बाबर यांची ही पहिलीच टर्म असून ती शेवटची ठरू शकते, त्यामुळे त्यांनी वक्तव्यांमध्ये संयम ठेवणे गरजेचे असल्याचा सल्लाही त्यांनी दिला.
बाबर यांनी केलेल विधान चुकीच असल्याच सांगत, “राजकारणात बोलताना तोल सांभाळणे आवश्यक असते. अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात,” असा इशाराही महाजन यांनी दिला. या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, उपमुख्यमंत्री आणि शिंदेसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांना समज द्यावी, अशी अपेक्षाही महाजन यांनी व्यक्त केली. या वक्तव्यामुळे खानापूर विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिंदेसेना यांच्यातील राजकीय तणाव अधिकच वाढत चालल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा: मुख्यमंत्र्यांबाबत अयोग्य भाषा वापरणाऱ्यांना जनताच योग्य उत्तर देईल, गोपीचंद पडळकर यांचा इशारा.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










