सांगली : डाक जीवन विम्याच्या १४२व्या वर्धापन दिनानिमित्त सांगली टपाल विभागाने देशपातळीवर विक्रमी कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. एका दिवसात तब्बल ५,२०२ नागरिकांचा एकूण १६६ कोटी रुपयांचा विमा उतरवण्यात आला असून, ७ कोटी ४१ लाख रुपयांहून अधिक हप्ता भरणा करण्यात आला आहे.
वर्धापनदिनानिमित्त देशभर राबविण्यात आलेल्या ‘महा लॉगिन डे’ उपक्रमात सांगली टपाल विभागाने सर्वाधिक पॉलिसी नोंदवून आघाडी घेतली. शहरी भागासाठी डाक जीवन विमा (PLI) तर ग्रामीण भागासाठी ग्रामीण टपाल जीवन विमा (RPLI) योजनेंतर्गत ही नोंदणी करण्यात आली.
या यशासाठी सांगली विभागातील सर्व मुख्य व उपटपाल कार्यालये तसेच कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम केल्याचे सांगण्यात आले. सांगलीच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्र सर्कलनेही राज्यस्तरावर आघाडी घेतली असून, एकूण ८२० कोटी रुपयांहून अधिक विमा उतरवण्यात आला आहे.
डाक जीवन विमा सेवेवर जनतेचा असलेला विश्वास हीच या यशाची मुख्य ताकद असल्याचे टपाल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा: आचारसंहितेत मिरज महामार्गावर १५ किलो चांदी जप्त; महसूल व पोलिसांची संयुक्त कारवाई.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










