सांगली : सांगली शहर व परिसरात महावितरणकडून स्मार्ट मीटर बसविण्यात आल्यानंतर अनेक नागरिकांचे वीज बिल अचानक वाढून येत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. विशेष म्हणजे वीज वापरात कोणताही बदल नसतानाही मागील महिन्यांच्या तुलनेत वाढीव बिले येत असल्याचा दावा नागरिकांकडून केला जात आहे.
काही नागरिकांच्या मते, स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी दरमहा ५०० ते ८०० रुपयांपर्यंत येणारे वीज बिल आता १,२०० रुपये ते थेट १,५०० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. वीज वापर पूर्वीइतकाच असूनही बिलात लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धतीबाबत तसेच नवीन मिटरच्या बिल आकारणी प्रक्रियेबाबत नागरिकांमधून शंका व्यक्त केली जात आहे. अनेकांनी महावितरणकडे याबाबत तक्रारी नोंदविल्या असून, वाढीव बिलांचे कारण स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, यापूर्वीही स्मार्ट मीटर बसविणे व वीज दरवाढीविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. स्मार्ट मीटर केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयामुळेच बसविले जात असून, जबरदस्तीने मीटर लावले जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला होता.
स्मार्ट मीटरमुळे प्रत्यक्षात वीज बिलात वाढ होत आहे की मोजणी पद्धतीत बदल झाला आहे, याबाबत महावितरणने अधिकृत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
हेही वाचा: सांगली टपाल विभागाची विक्रमी कामगिरी; देशात प्रथम क्रमांक.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










