सांगली : डाक जीवन विम्याच्या १४२व्या वर्धापन दिनानिमित्त सांगली टपाल विभागाने देशपातळीवर विक्रमी कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. एका दिवसात तब्बल ५,२०२ नागरिकांचा एकूण १६६ कोटी रुपयांचा विमा उतरवण्यात आला असून, ७ कोटी ४१ लाख रुपयांहून अधिक हप्ता भरणा करण्यात आला आहे.
वर्धापनदिनानिमित्त देशभर राबविण्यात आलेल्या ‘महा लॉगिन डे’ उपक्रमात सांगली टपाल विभागाने सर्वाधिक पॉलिसी नोंदवून आघाडी घेतली. शहरी भागासाठी डाक जीवन विमा (PLI) तर ग्रामीण भागासाठी ग्रामीण टपाल जीवन विमा (RPLI) योजनेंतर्गत ही नोंदणी करण्यात आली.
या यशासाठी सांगली विभागातील सर्व मुख्य व उपटपाल कार्यालये तसेच कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम केल्याचे सांगण्यात आले. सांगलीच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्र सर्कलनेही राज्यस्तरावर आघाडी घेतली असून, एकूण ८२० कोटी रुपयांहून अधिक विमा उतरवण्यात आला आहे.
डाक जीवन विमा सेवेवर जनतेचा असलेला विश्वास हीच या यशाची मुख्य ताकद असल्याचे टपाल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा: आचारसंहितेत मिरज महामार्गावर १५ किलो चांदी जप्त; महसूल व पोलिसांची संयुक्त कारवाई.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










