सांगली : डाक जीवन विम्याच्या १४२व्या वर्धापन दिनानिमित्त सांगली टपाल विभागाने देशपातळीवर विक्रमी कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. एका दिवसात तब्बल ५,२०२ नागरिकांचा एकूण १६६ कोटी रुपयांचा विमा उतरवण्यात आला असून, ७ कोटी ४१ लाख रुपयांहून अधिक हप्ता भरणा करण्यात आला आहे.
वर्धापनदिनानिमित्त देशभर राबविण्यात आलेल्या ‘महा लॉगिन डे’ उपक्रमात सांगली टपाल विभागाने सर्वाधिक पॉलिसी नोंदवून आघाडी घेतली. शहरी भागासाठी डाक जीवन विमा (PLI) तर ग्रामीण भागासाठी ग्रामीण टपाल जीवन विमा (RPLI) योजनेंतर्गत ही नोंदणी करण्यात आली.
या यशासाठी सांगली विभागातील सर्व मुख्य व उपटपाल कार्यालये तसेच कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम केल्याचे सांगण्यात आले. सांगलीच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्र सर्कलनेही राज्यस्तरावर आघाडी घेतली असून, एकूण ८२० कोटी रुपयांहून अधिक विमा उतरवण्यात आला आहे.
डाक जीवन विमा सेवेवर जनतेचा असलेला विश्वास हीच या यशाची मुख्य ताकद असल्याचे टपाल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा: आचारसंहितेत मिरज महामार्गावर १५ किलो चांदी जप्त; महसूल व पोलिसांची संयुक्त कारवाई.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










