सांगली : दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी सांगली जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांच्या परिसरात कडक मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. परीक्षा शांततेत पार पडावी व कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी जिल्हा दंडाधिकारी अशोक काकडे यांनी परीक्षा केंद्रांच्या इमारतीपासून १०० मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत आदेश जारी केले आहेत.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२ वी) १० फेब्रुवारी ते ११ मार्च २०२६ या कालावधीत ५२ केंद्रांवर, तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत १०५ केंद्रांवर होणार आहे.
या कालावधीत परीक्षा केंद्रांच्या परिसरात परीक्षेस संबंधित अधिकारी, कर्मचारी व परीक्षार्थी विद्यार्थी वगळता चार किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येणे, गटागटाने फिरणे अथवा थांबण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच झेरॉक्स मशिन, टेलिफोन बुथ, फॅक्स मशिन आणि ध्वनीक्षेपक यांचा परीक्षा संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
परीक्षा केंद्रांमध्ये मोबाईल फोन व पेजर नेण्यासही सक्त मनाई करण्यात आली असून, आदेशांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा: सांगलीत स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात मोठी वाढ? वापर तितकाच, मात्र वाढलेली बिले नागरिकांसाठी चिंतेचा विषय.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









