सांगली : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत १२ वी नंतर पदवी व पदव्युत्तर (व्यावसायिक व बिगर व्यावसायिक) अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक धनश्री भांबुरे यांनी केले आहे.
ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून आवश्यक कागदपत्रांसह इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, सांगली येथे १६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत जमा करणे बंधनकारक आहे.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राज्यातील महानगरपालिका, विभागीय शहरे तसेच जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागू आहे. मान्यताप्राप्त शासकीय, अनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालये व तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेतलेल्या आणि शासकीय वसतिगृह योजनेपासून वंचित राहिलेल्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती (भटक्या जमाती–क धनगर समाज वगळून) तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही आणि ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे, असे विद्यार्थी या योजनेस पात्र आहेत. जिल्हा स्तरावर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष ४३ हजार रुपये, तर तालुका स्तरावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष ३८ हजार रुपये इतका आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.
पात्र विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा: ध्वजदिन निधीस सढळ हाताने मदत करा; जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे आवाहन.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










