सांगली : अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या कवलापूर विमानतळ प्रकल्पाबाबत आता प्रत्यक्ष हालचाली सुरू झाल्याने सांगली जिल्ह्यात उत्सुकता वाढली आहे. राज्य सरकारकडून लवकरच प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात येणार असून, तो प्राप्त होताच केंद्र सरकारचे पथक प्रत्यक्ष पाहणीसाठी कवलापूर येथे येणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
विमानतळासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देणे व भूसंपादन प्रक्रिया ही राज्य सरकारची जबाबदारी असून, त्या दृष्टीने जिल्हाधिकारी स्तरावर प्राथमिक हालचाली सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रस्तावानंतर तांत्रिक, भौगोलिक आणि व्यवहार्यता पाहणी केली जाणार आहे.
दरम्यान, अलीकडील विमान दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर देशातील अनियंत्रित एअर स्ट्रीपची माहितीही मागविण्यात आल्याचे मंत्री मोहोळ यांनी सांगितले. बारामतीतील एअर स्ट्रीप ही फ्लाइंग क्लबच्या प्रशिक्षण संस्थेशी संबंधित असून, संबंधित दुर्घटनेचा तपास सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कवलापूर येथे विमानतळ प्रकल्प साकार झाल्यास सांगली-मिरज औद्योगिक क्षेत्राला थेट हवाई जोडणी मिळू शकते. निर्यात, वैद्यकीय सेवा, पर्यटन आणि नव्या उद्योग गुंतवणुकीला या विमानतळामुळे चालना मिळेल, एकूणच सांगली जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.
हेही वाचा: पैसे ट्रान्सफर, 30 टन माल गायब; कुपवाड एमआयडीसीतील कंपनीची 19 लाखांची फसवणूक.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










