सांगली : अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या कवलापूर विमानतळ प्रकल्पाबाबत आता प्रत्यक्ष हालचाली सुरू झाल्याने सांगली जिल्ह्यात उत्सुकता वाढली आहे. राज्य सरकारकडून लवकरच प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात येणार असून, तो प्राप्त होताच केंद्र सरकारचे पथक प्रत्यक्ष पाहणीसाठी कवलापूर येथे येणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
विमानतळासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देणे व भूसंपादन प्रक्रिया ही राज्य सरकारची जबाबदारी असून, त्या दृष्टीने जिल्हाधिकारी स्तरावर प्राथमिक हालचाली सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रस्तावानंतर तांत्रिक, भौगोलिक आणि व्यवहार्यता पाहणी केली जाणार आहे.
दरम्यान, अलीकडील विमान दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर देशातील अनियंत्रित एअर स्ट्रीपची माहितीही मागविण्यात आल्याचे मंत्री मोहोळ यांनी सांगितले. बारामतीतील एअर स्ट्रीप ही फ्लाइंग क्लबच्या प्रशिक्षण संस्थेशी संबंधित असून, संबंधित दुर्घटनेचा तपास सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कवलापूर येथे विमानतळ प्रकल्प साकार झाल्यास सांगली-मिरज औद्योगिक क्षेत्राला थेट हवाई जोडणी मिळू शकते. निर्यात, वैद्यकीय सेवा, पर्यटन आणि नव्या उद्योग गुंतवणुकीला या विमानतळामुळे चालना मिळेल, एकूणच सांगली जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.
हेही वाचा: पैसे ट्रान्सफर, 30 टन माल गायब; कुपवाड एमआयडीसीतील कंपनीची 19 लाखांची फसवणूक.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










