सांगली : पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा 5.0’ अभियानात सांगली जिल्हा परिषदेला सलग तिसऱ्यांदा राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. या कामगिरीमुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना एकूण 10 कोटी 75 लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे.
राज्यस्तरीय मूल्यांकनात जलसंधारण, वृक्षलागवड, प्लास्टिकमुक्त उपक्रम, सांडपाणी व्यवस्थापन आणि स्वच्छता यांसारख्या घटकांवर झालेल्या कामाच्या आधारे सांगली जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पंचायत समित्यांमध्ये तासगाव प्रथम, मिरज द्वितीय आणि कवठेमहांकाळ तृतीय क्रमांकावर आहे. बोरगाव, कासेगाव, येडेनिपाणी, आळसंद, वाळेखिंडी, नांगोळे, लंगरपेठ, पिंपळवाडी, पेठ, सलगरे, अग्रण धुळगाव आणि अलकूड या ग्रामपंचायतींनी आपल्या लोकसंख्या गटात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.
या पारितोषिकाच्या रकमेतून संबंधित ग्रामपंचायतींमधील पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा आणि स्वच्छता उपक्रमांना चालना मिळणार आहे.
सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनाही ‘सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी’ म्हणून राज्यात प्रथम क्रमांक जाहीर झाला आहे. 21 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात गुणवंतांचा सन्मान केला जाणार आहे.
हेही वाचा: सलग दुसऱ्या दिवशी फिरला बुलडोझर; सांगली बसस्थानक-100 फुटी रोड परिसरातील 22 अतिक्रमणे हटवली.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










