‘माझी वसुंधरा ५.०’मध्ये सांगलीची हॅट्रिक; मिळवले 10.75 कोटींचे बक्षीस

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
पर्यावरण संवर्धनासाठी ‘माझी वसुंधरा 5.0’ अभियान; सांगली जिल्हा राज्यात प्रथम. | प्रतिनिधिक छायाचित्र

सांगली : पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा 5.0’ अभियानात सांगली जिल्हा परिषदेला सलग तिसऱ्यांदा राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. या कामगिरीमुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना एकूण 10 कोटी 75 लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे.

राज्यस्तरीय मूल्यांकनात जलसंधारण, वृक्षलागवड, प्लास्टिकमुक्त उपक्रम, सांडपाणी व्यवस्थापन आणि स्वच्छता यांसारख्या घटकांवर झालेल्या कामाच्या आधारे सांगली जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पंचायत समित्यांमध्ये तासगाव प्रथम, मिरज द्वितीय आणि कवठेमहांकाळ तृतीय क्रमांकावर आहे. बोरगाव, कासेगाव, येडेनिपाणी, आळसंद, वाळेखिंडी, नांगोळे, लंगरपेठ, पिंपळवाडी, पेठ, सलगरे, अग्रण धुळगाव आणि अलकूड या ग्रामपंचायतींनी आपल्या लोकसंख्या गटात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.

या पारितोषिकाच्या रकमेतून संबंधित ग्रामपंचायतींमधील पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा आणि स्वच्छता उपक्रमांना चालना मिळणार आहे.

सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनाही ‘सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी’ म्हणून राज्यात प्रथम क्रमांक जाहीर झाला आहे. 21 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात गुणवंतांचा सन्मान केला जाणार आहे.

हेही वाचा: सलग दुसऱ्या दिवशी फिरला बुलडोझर; सांगली बसस्थानक-100 फुटी रोड परिसरातील 22 अतिक्रमणे हटवली.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा