सांगली : बुधवारी संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर गुरुवार 19 फेब्रुवारीपासून रमजान महिन्याला सुरुवात झाली. पहाटेपासून शहरातील प्रमुख मशिदींमध्ये नमाजासाठी गर्दी दिसून येत आहे. बुधवारी रात्री तरावीह नमाज अदा करण्यात आली.
रमजान महिन्यात मुस्लिम बांधव सूर्योदयापूर्वी सहरी करून दिवसभर उपवास पाळतात. संध्याकाळी इफ्तारनंतर खजूर खाऊन रोजा सोडण्याची परंपरा आहे. हा पवित्र महिना साधारण 29 ते 30 दिवसांचा असतो.
रमजानच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील कापड पेठ, शिवाजी मंडई आणि मारुती रोड परिसरात फळे, खजूर व शरबत साहित्य खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. अनेक ठिकाणी खजूर विक्रीसाठी स्टॉल उभारण्यात आले आहेत. व्यापाऱ्यांच्या मते यंदा ‘अजवा खजूर’ला विशेष मागणी आहे.
हेही वाचा: चंद्र मोहिमेत सांगलीचा सहभाग; ‘या’ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची नावे ‘नासा’च्या आर्टेमिस-2 मोहिमेत.
- बंगळुरू-मुंबई स्लीपर वंदे भारतवरून नवा वाद; सांगली-बेळगावला डावलले जाणार?
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक










