शिवजयंतीनंतर मारुती चौकात कचऱ्याचा ढिग; प्रशासनाची तातडीने स्वच्छता मोहीम, जिल्हाधिकाऱ्यांनीही हातात घेतला झाडू

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
शिवजयंतीनंतर मारुती चौक परिसरात राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेचे दृश्य.

सांगली : शिवजयंतीनिमित्त मारुती चौक परिसरात झालेल्या कार्यक्रमांनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवली.

मारुती चौक येथील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळा परिसरात विशेष स्वच्छता करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी स्वतः झाडू हातात घेत स्वच्छतेत सहभाग घेतला. उत्सवानंतर सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे ही प्रशासन आणि नागरिक दोघांचीही जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

मोठ्या कार्यक्रमांनंतर अनेकदा प्लास्टिक पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, फुले आणि इतर कचरा रस्त्यावर विखुरलेला दिसतो. त्यामुळे नागरिकांना त्रास होण्याची शक्यता निर्माण होते. अस्वछता टाळण्यासाठी ‘कचरामुक्त उत्सव’ ही संकल्पना पुढे नेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

या मोहिमेत निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, उपजिल्हाधिकारी सतीश कदम, विजया यादव, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे तसेच महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. काही सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनीही श्रमदान केले.

दरम्यान, नागरिकांनीही उत्सवानंतर स्वच्छतेत सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा: नोकरीची संधी! सांगलीतील क्रेडिट सोसायटीत 32 पदांसाठी भरती, दहावी पास ते पदवीधरांसाठी संधी.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा